मेरे अपने - सिप्पी पिक्चर्स ने १९७१ मध्ये रिलीज केलेला चित्रपट. त्यावेळी हा चित्रपट मी रस्त्यावर पहिला होता. रस्त्यावर म्हणजे त्यावेळी चाळी मध्ये रहात होतो - दीलाइल रोड ला संभाजी नगर मध्ये रहात होतो. चाळी मध्ये पूजा असली, काही कार्यक्रम असला की संध्याकाळी व्याख्याने, रेकोर्ड डान्स अथवा चित्रपट ठेवला जात असे. व्याख्यान असेल तर त्याला फार कमी प्रतिसाद असे, रेकोर्ड डान्स ला बर्यापैकी गर्दी जमे पण चित्रपट असला की मैदान होऊस्फुल ! सन्ध्याकाळी ८ वाजल्यापासून आपापल्या जागा अडवण्याची स्पर्धा सुरू होत असे. तर अशा एका कार्यक्रमात मी मेरे अपने पाहिला - अर्थात black and white.
खरे म्हणजे मला हा पिक्चर पहायाचा न्हवता - एखाद तास बसू आणि निघून येवू असा सरळ विचार होता. कारण ७० च्या त्या दशकात राजेश खन्ना चा जबरदस्त पगडा सर्वांवर होता. राजेश खन्ना नसलेला पिक्चर आम्हाला अळणी वाटायचा. पिक्चर बघितला असे वाटायचेच नाही. आणि ह्या मेरे अपने मध्ये तर मीना कुमारी, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा असे आमच्या नावडीचे कलाकार. तरी पण तो पिक्चर मी टाईम पास म्हणून पहायाचे ठरवले . आश्चर्य म्हणजे मी हा पिक्चर अगदी पूर्ण पाहिला. त्या पिक्चरने शेवट पर्यंत जखडून ठेवले. एक चांगला चित्रपट काय आणि कसा असतो ते त्या वेळी कळले. त्या चित्रपटाने एक वेगळाच ठसा माझ्या बालमनावर त्यावेळी उठवला तो अजून कायम आहे.
आज मागे वळून पहिले तर मी म्हणेन की हा पहिला gang war चित्रपट असावा. त्यावेळी गल्लोगल्ली असणार्या छोट्या छोट्या ग्यांग मध्ये चालणार्या मारामार्या ह्या चित्रपटामध्ये परिणामकारक रीत्या दाखवल्या होत्या. तरुण मुले वाम मार्गाला का वळतात त्याचे अतिशय सुंदर चित्रण गुलजार ह्यांनी ह्या चित्रात केले आहे. सामाजिक स्थिती, ग्रजूएट मुलाला नोकरी नसल्याने घरून मिळणारे टोमणे, प्रेयसी ने नोकरी लागायची वाट पाहोन शेवटी दिलेला नकार, त्यातून आलेले वैफल्य, व्यापाऱ्यांचा काळा बाजार, नोकरीतली वशिलेबाजी, लाच घेणारे पोलीस, नेत्यांचा स्वार्थ आणि बेकार तरुणांना वापरून घेण्याची वृत्ती, प्रामाणिक पणाचा पराजय - ह्या सर्व गोष्टींचे वास्तव वादी सादरीकरण गुलजार ह्यांनी उत्तम रीतीने केले आहे.
आनंदी नावाच्या म्हातारीला(मीना कुमारी) अरुण (रमेश देव) गावाहून शहरात घेवून येतो - तिला इकडे आल्यावर कळते कि ती त्याची कोणी नातेवाईक नसते तर अरुण ने तिला घरकामासाठी आणले असते. फसवल्याची जाणीव झाल्यावर आनंदी दु:खी होते आणि अरुण चे घर सोडून जाते - ती श्याम (विनोद खन्ना) च्या आश्रयाला येते - जो नोकरी नसल्याने घरच्यांच्या टोमण्यांनी हैराण होवून आणि प्रेयसीने नकार दिल्याने निराश होवून घर सोडून एका पडक्या वाड्यात रहात असतो. त्याच्याबरोबर त्यांच्या बेकार मित्रांची ग्यांग असते. दुसर्या गल्लीतला त्याचा दुश्मन म्हणजे छैनू (शत्रुघ सिन्हा) - त्याची पण आपली एक ग्यांग असते. ह्या दोन पार्टी तला संघर्षाची कथा म्हणजे मेरे अपने. ह्यातल्या बेकार तरुणांची घरे दारे असतात, नातेवाईक असतात, आनंदी कोणाची कोण असते - ती श्याम च्या टोळी ला जीव लावते तसेच ती छैनू च्या टोळी ला पण जीव लावते. शेवटी ती दोन टोळ्यांचा समेट करण्याचा प्रयत्न करते - पण पोलिसांची गोळी लागून प्राणाला मुकते. कोण - कोणाची कोण त्यांची "मेरे अपने" झालेली असते. दोन्ही टोळ्या आणि त्यांचे नायक शेवटी भावूक होतात - काय मिळवले ह्याचा हिशेब करत जेल मध्ये जातात. आनंदी चे प्रेत मुनिसिपाल्टची गाडी बेवारस म्हणून घेवून जाते.
विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा चे काम खूप छान झाले आहे. श्याम तर पिक्चर संपला तरी मनातून बाहेर जात नाही. Dany Dangzopa आणि पेंटल खूपच तरुण आहेत. बहुतेक त्यांचा पहिला पिक्चर असावा.
ह्यातली दोन गाणी कानात गुंजत रहातात. " कोई होता जिसको अपना" हे तर टायटल सॉंग आहे. त्याच बरोबर श्याम ची टोळीवर चित्रित केलेले " हालचाल ठीक ठाक है" हे गीत तर खूप छान चित्रित केले आहे - तरुणांची विमनस्कता ह्या गाण्या द्वारे फार प्रभावी रीत्या दाखवलेली आहे.
आज हा पिक्चर एखाद्या च्यानेल वर लागला तरी मी पहातो. कंटाळा येत नाही. all time favorite पैकी हा एक पिक्चर आहे. आपण पण जरूर पहा.
प्रकाश सावंत
खरे म्हणजे मला हा पिक्चर पहायाचा न्हवता - एखाद तास बसू आणि निघून येवू असा सरळ विचार होता. कारण ७० च्या त्या दशकात राजेश खन्ना चा जबरदस्त पगडा सर्वांवर होता. राजेश खन्ना नसलेला पिक्चर आम्हाला अळणी वाटायचा. पिक्चर बघितला असे वाटायचेच नाही. आणि ह्या मेरे अपने मध्ये तर मीना कुमारी, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा असे आमच्या नावडीचे कलाकार. तरी पण तो पिक्चर मी टाईम पास म्हणून पहायाचे ठरवले . आश्चर्य म्हणजे मी हा पिक्चर अगदी पूर्ण पाहिला. त्या पिक्चरने शेवट पर्यंत जखडून ठेवले. एक चांगला चित्रपट काय आणि कसा असतो ते त्या वेळी कळले. त्या चित्रपटाने एक वेगळाच ठसा माझ्या बालमनावर त्यावेळी उठवला तो अजून कायम आहे.
आनंदी नावाच्या म्हातारीला(मीना कुमारी) अरुण (रमेश देव) गावाहून शहरात घेवून येतो - तिला इकडे आल्यावर कळते कि ती त्याची कोणी नातेवाईक नसते तर अरुण ने तिला घरकामासाठी आणले असते. फसवल्याची जाणीव झाल्यावर आनंदी दु:खी होते आणि अरुण चे घर सोडून जाते - ती श्याम (विनोद खन्ना) च्या आश्रयाला येते - जो नोकरी नसल्याने घरच्यांच्या टोमण्यांनी हैराण होवून आणि प्रेयसीने नकार दिल्याने निराश होवून घर सोडून एका पडक्या वाड्यात रहात असतो. त्याच्याबरोबर त्यांच्या बेकार मित्रांची ग्यांग असते. दुसर्या गल्लीतला त्याचा दुश्मन म्हणजे छैनू (शत्रुघ सिन्हा) - त्याची पण आपली एक ग्यांग असते. ह्या दोन पार्टी तला संघर्षाची कथा म्हणजे मेरे अपने. ह्यातल्या बेकार तरुणांची घरे दारे असतात, नातेवाईक असतात, आनंदी कोणाची कोण असते - ती श्याम च्या टोळी ला जीव लावते तसेच ती छैनू च्या टोळी ला पण जीव लावते. शेवटी ती दोन टोळ्यांचा समेट करण्याचा प्रयत्न करते - पण पोलिसांची गोळी लागून प्राणाला मुकते. कोण - कोणाची कोण त्यांची "मेरे अपने" झालेली असते. दोन्ही टोळ्या आणि त्यांचे नायक शेवटी भावूक होतात - काय मिळवले ह्याचा हिशेब करत जेल मध्ये जातात. आनंदी चे प्रेत मुनिसिपाल्टची गाडी बेवारस म्हणून घेवून जाते.
विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा चे काम खूप छान झाले आहे. श्याम तर पिक्चर संपला तरी मनातून बाहेर जात नाही. Dany Dangzopa आणि पेंटल खूपच तरुण आहेत. बहुतेक त्यांचा पहिला पिक्चर असावा.
ह्यातली दोन गाणी कानात गुंजत रहातात. " कोई होता जिसको अपना" हे तर टायटल सॉंग आहे. त्याच बरोबर श्याम ची टोळीवर चित्रित केलेले " हालचाल ठीक ठाक है" हे गीत तर खूप छान चित्रित केले आहे - तरुणांची विमनस्कता ह्या गाण्या द्वारे फार प्रभावी रीत्या दाखवलेली आहे.
आज हा पिक्चर एखाद्या च्यानेल वर लागला तरी मी पहातो. कंटाळा येत नाही. all time favorite पैकी हा एक पिक्चर आहे. आपण पण जरूर पहा.
प्रकाश सावंत
No comments:
Post a Comment