यंत्रयुग आणि आधुनिकीकरण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्याबद्दल आमचा एक दिवस अड्डा जमला होता त्यावेळी बरीच चर्चा झाली.
पूर्वी घरोघरी विहिरी होत्या. गावागावात होत्या. मुंबई मध्ये होत्या. पुण्यात वाड्यांमध्ये होत्या. विहिरीतून पाणी काढताना जबरदस्त व्यायाम होत असे. आज विहिरी असतील तर त्यावर पंप लावले गेले. बोरवेल काढल्या गेल्या. पाणी भरताना करावी लागणारी मेहनत संपली. शहरामध्ये घरोघरी नळ आले. त्यामानाने अजून बर्याच ठिकाणी विहिरी अस्तित्वात आहेत आणि "नाईलाज को क्या इलाज" म्हणून काही लोकांना त्या वापराव्या लागत आहेत. बऱ्याच लोकनी आता विहिरींवर पंप बसवले आहेत.
एके काळी जाते दळण्यासाठी वापरले जात असे. कमीत कमी एक तास जात्यावर मेहनत केली की पीठ निघत असे. त्यानंतर गल्लोगल्ली पिठाच्या गिरण्या आल्या. घरातली जाती केंव्हा दिसेनाशी झाली कळलेच नाही. मध्यंतरी घरात गहू दळण्यासाठी छोट्या गिरण्या आल्या होत्या व अजूनही आहेत. त्या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत - कदाचित शेजारी अथवा खाली रहाणारे शेजार् च्या लोकांनी तक्रार करून उबग आणला असेल. आता तर पिठाच्या गिरण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रेडीमेड आटा आता वाण्याच्या दुकानात मिळू लागला आहे. पुढ्या पिढीला पिठाच्या गिरण्या होत्या आणि त्यावर लोक गहू घेवून दालायाला जात होते हे सांगितले तर विश्वास बसणार नाही. आता पिठाच्या गिरण्यांचे फोटो काढून ठेवायला हवेत.
दळप गेले - कांडप पण गेले. गावच्या घरात उखळ असे. त्यात मुसळ घालून हाताने कांडप केले जात असे. शहरात रहाणाऱ्या मुलांना जाते आणि उखळ सिनेमा किंवा विडीयो मध्ये दाखवावे लागेल. प्रत्येक घरात असणारा पाटा आणि वरवंटा किंवा रगडा पण आता इतिहास जमा होण्याची वेळ आलेली आहे. जाते, उखळ, पाटा, वरवंटा ह्यांची रवानगी आता मागल्या दारी किंवा परसदारी झालेली दिसते. मिक्सर आता गावोगावी दिसू लागले आहेत.
धुणी धुण्यासाठी कोसभर लांब नदी वर जावे लागत असे. तिथे दगडावर आपटून व रगडून कपडे धुवावे लागत असत. कपड्यातले पाणी काढण्यासाठी ते जबरदस्त पिळावे लागत असत आणि मग घरी आणून सुकण्यासाठी दोरीवर टाकावे लागत असत. आता वाशिंग मशीन ने हे सर्व श्रम संपवून टाकले आहेत.
किचन चा ओटा नावाचा प्रकार पूर्वी न्हवताच मुळी. चुली अथवा स्टोव असायाचा. चूल असेल तर ती पेटवण्यासाठी फुंकणी फुकून गाल दुखू लागत असत. चूल खाली - डबे वरती - अशी सारखी उठ बस करावी लागत असे. आता ओटे आले. ग्यास आले. उभ राहून स्वयंपाक करायची पद्धत आली.
शेतात नांगर चालवणे, मोट ओढणे, जमीन करणे, जमीन चोपणे व सपाट करणे, पेरणी करणे अशी अनेक कामे श्रमाची होती. अजून ही होत असतील. पण आता यंत्रांचा वापर शेती मध्ये सुरु झाला.
आज गावामध्ये सुट्टीत गेले की आपण ह्या यंत्रांच्या किती स्वाधीन झालो आहोत ह्याची जाणीव लाईट गेल्यावर होते! पंखे बंद, मिक्सर बंद, गिझर बंद, दूरदर्शन बंद, आकाशवाणी बंद, पिठाची गिरणी बंद, मोटार व बाईक रीपारिंग बंद, सायकल मध्ये हवा भरणाऱ्या अन्नाचे दुकान बंद, घरात पाणी बंद.
गावात असे तर शहरात काय? रेल्वे बंद. कंपन्या बंद. उत्पादन बंद. ट्राम बंद. प्रेस बंद. जीवन ठप्प.
मग आठवते आपण पूर्वी कसे दिवस काढले? आपल्या पूर्वजांनी कसे सारे जमवून नेले ? हा सवयीचा परिणाम? कधी कधी असे वाटते की ही यंत्र म्हणतील कि " आम्ही कोण म्हणूनि काय पुसता दांताड वेंगाडुनी?" किंवा "आम्हाला वगळा हतप्रभ झणी होतील यान्त्रांगणे - आम्हाला वगळा होईल कवडीमोल तुमचे जिणे किंवा होईल कष्टाचे तुमचे जिणे "
इति श्री यंत्र युग पुराण समाप्त
प्रकाश सावंत
पूर्वी घरोघरी विहिरी होत्या. गावागावात होत्या. मुंबई मध्ये होत्या. पुण्यात वाड्यांमध्ये होत्या. विहिरीतून पाणी काढताना जबरदस्त व्यायाम होत असे. आज विहिरी असतील तर त्यावर पंप लावले गेले. बोरवेल काढल्या गेल्या. पाणी भरताना करावी लागणारी मेहनत संपली. शहरामध्ये घरोघरी नळ आले. त्यामानाने अजून बर्याच ठिकाणी विहिरी अस्तित्वात आहेत आणि "नाईलाज को क्या इलाज" म्हणून काही लोकांना त्या वापराव्या लागत आहेत. बऱ्याच लोकनी आता विहिरींवर पंप बसवले आहेत.
एके काळी जाते दळण्यासाठी वापरले जात असे. कमीत कमी एक तास जात्यावर मेहनत केली की पीठ निघत असे. त्यानंतर गल्लोगल्ली पिठाच्या गिरण्या आल्या. घरातली जाती केंव्हा दिसेनाशी झाली कळलेच नाही. मध्यंतरी घरात गहू दळण्यासाठी छोट्या गिरण्या आल्या होत्या व अजूनही आहेत. त्या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत - कदाचित शेजारी अथवा खाली रहाणारे शेजार् च्या लोकांनी तक्रार करून उबग आणला असेल. आता तर पिठाच्या गिरण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रेडीमेड आटा आता वाण्याच्या दुकानात मिळू लागला आहे. पुढ्या पिढीला पिठाच्या गिरण्या होत्या आणि त्यावर लोक गहू घेवून दालायाला जात होते हे सांगितले तर विश्वास बसणार नाही. आता पिठाच्या गिरण्यांचे फोटो काढून ठेवायला हवेत.
दळप गेले - कांडप पण गेले. गावच्या घरात उखळ असे. त्यात मुसळ घालून हाताने कांडप केले जात असे. शहरात रहाणाऱ्या मुलांना जाते आणि उखळ सिनेमा किंवा विडीयो मध्ये दाखवावे लागेल. प्रत्येक घरात असणारा पाटा आणि वरवंटा किंवा रगडा पण आता इतिहास जमा होण्याची वेळ आलेली आहे. जाते, उखळ, पाटा, वरवंटा ह्यांची रवानगी आता मागल्या दारी किंवा परसदारी झालेली दिसते. मिक्सर आता गावोगावी दिसू लागले आहेत.
धुणी धुण्यासाठी कोसभर लांब नदी वर जावे लागत असे. तिथे दगडावर आपटून व रगडून कपडे धुवावे लागत असत. कपड्यातले पाणी काढण्यासाठी ते जबरदस्त पिळावे लागत असत आणि मग घरी आणून सुकण्यासाठी दोरीवर टाकावे लागत असत. आता वाशिंग मशीन ने हे सर्व श्रम संपवून टाकले आहेत.
किचन चा ओटा नावाचा प्रकार पूर्वी न्हवताच मुळी. चुली अथवा स्टोव असायाचा. चूल असेल तर ती पेटवण्यासाठी फुंकणी फुकून गाल दुखू लागत असत. चूल खाली - डबे वरती - अशी सारखी उठ बस करावी लागत असे. आता ओटे आले. ग्यास आले. उभ राहून स्वयंपाक करायची पद्धत आली.
शेतात नांगर चालवणे, मोट ओढणे, जमीन करणे, जमीन चोपणे व सपाट करणे, पेरणी करणे अशी अनेक कामे श्रमाची होती. अजून ही होत असतील. पण आता यंत्रांचा वापर शेती मध्ये सुरु झाला.
आज गावामध्ये सुट्टीत गेले की आपण ह्या यंत्रांच्या किती स्वाधीन झालो आहोत ह्याची जाणीव लाईट गेल्यावर होते! पंखे बंद, मिक्सर बंद, गिझर बंद, दूरदर्शन बंद, आकाशवाणी बंद, पिठाची गिरणी बंद, मोटार व बाईक रीपारिंग बंद, सायकल मध्ये हवा भरणाऱ्या अन्नाचे दुकान बंद, घरात पाणी बंद.
गावात असे तर शहरात काय? रेल्वे बंद. कंपन्या बंद. उत्पादन बंद. ट्राम बंद. प्रेस बंद. जीवन ठप्प.
मग आठवते आपण पूर्वी कसे दिवस काढले? आपल्या पूर्वजांनी कसे सारे जमवून नेले ? हा सवयीचा परिणाम? कधी कधी असे वाटते की ही यंत्र म्हणतील कि " आम्ही कोण म्हणूनि काय पुसता दांताड वेंगाडुनी?" किंवा "आम्हाला वगळा हतप्रभ झणी होतील यान्त्रांगणे - आम्हाला वगळा होईल कवडीमोल तुमचे जिणे किंवा होईल कष्टाचे तुमचे जिणे "
इति श्री यंत्र युग पुराण समाप्त
प्रकाश सावंत
No comments:
Post a Comment