छोडो कल कि बाते - ह्या हम हिंदुस्थानी सिनेमातल्या गाण्यावर फेसबुक वर त्या गाण्याबद्दल आणि त्यावेळच्या काळाबद्दल एक पोस्ट आली होती त्यावरून मला सुचलेले काही विचार…
स्वातंत्र्य नुकतेच मिळालेले. नवीन भारत घडवण्याची जिद्द सर्वांच्याच मनात. धरणे, पूल, तलाव, नव्या शासकीय इमारती बांधल्या जाऊ लागलेल्या होत्या; हरित क्रान्ती येऊ घातलेली, औद्योगिकरणाची सुरुवात झालेली, बँका आणि विमा कंपनीचे राष्ट्रीयकरण झालेले, कृषिप्रधान भारत देश विकनशील होण्यासाठी पावले टाकणारा, प्रजासत्ताक होऊ घातलेला, शिस्तप्रिय जनता आणि जागरूक नागरिक होण्याची जाणीव ठेऊन नव्या उमेदी, नव्या आशा, नवी स्वप्ने त्यावेळची पिढी पाहात होती ते हे सारे ह्या गाण्यांत सामावलेले आहे. त्यावेळी प्रगती वाटणारे औद्योगिकरण/वाढणारी वाहने आणि दळणवळण पुढे जाऊन प्रदूषणाचा राक्षस उभा करणार हे कोणाला माहीत होते? हरित क्रांती मध्ये रसायनांचा खते म्हणून होणारा अतिरेकी वापर आरोग्यास अपाय करेल असा विचार त्यावेळी स्वप्नात सुद्धा आला नसेल. त्यावेळी गाण्यांत वर्णन केलेला भारत खरोखरीच तसा घडला का? स्वातंत्र्यानंतर किती नवी धरणे बांधली? किती नवीन ताजमहाल/कुतुबमिनार/शासकीय इमारती उभारल्या? किती वर्षे लागली नवे मोठे रस्ते बनवायला? रेल्वे चे नवे जाळे तयार केले का? गावे आणि शहरे रेल्वे आणि रस्त्यानी जोडून जवळ आणली का? शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली का कोलमडून पाडली?
एवढा मोठा देशाचा समुद्रकिनारा असतांना किनाऱ्यावरची शहरे जलवाहतुकीने का जोडली नाहीत? कोस्टल रोड ची कल्पना आधी का सुचली नाही. कित्येक नवीन पूल, रस्ते आणि प्रकल्प वेळेत का कार्यान्वित केले नाहीत? त्यांना वेळ का लावला? मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारख्या वाहतूक व्यवस्था उशिरा का आणल्या गेल्या? शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल का केला गेला नाही? शिक्षण देण्यासाठी शाळा आणि कॉलेजे कारखान्यासारखी का काढली? ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था का पांगळी ठेवली? करोना काळात ग्रामी सोडा शहरातली आरोग्य व्यवस्थेची पूर्ण वाताहत झाली होती. राज्यकर्ते सेवक होते ते जनतेचे मालक कधी बनले? स्विस बँकेत आपल्या देशाची संपत्ती कोणी भरली? भ्रष्टाचार कधी शिरला आणि शिष्टाचार कधी झाला? पोलीस आणि इतर सरकारी खात्यात चिरीमिरी द्यावीच लागणार मानसिक अवस्था आपण कधी स्वीकारली? सरकारी कार्यालयातील कार्यक्षमता वाढली का? कठोर परिश्रमास पर्याय नाही सारखी घोषवाक्ये का लिहावी लागतात? किती नागरिक शिस्त पाळतात- रांगेत उभे रहाताना, रस्त्यावर चालतांना किंवा वाहन चालवतांना? डोनेशन घेऊन ऍडमिशन ची समांतर यंत्रणा का उभी केली गेली? जातीयवाद / धर्मवाद का पोसला गेला? नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आणून कार्यक्षम आणि योग्यता असणाऱ्या तरुणांची घुसमट का केली गेली? त्यांना नैराशेच्या गर्तेत का घातले गेले? तरुणांनी प्रायव्हेट नोकऱ्याना प्राधान्य का दिले? मधली एक चांगली शिकलेली पिढी युरोप आणि अमेरिकेला का गेली? हम हिंदुस्थानी गाण्यांत वर्णिलेला हिंदुस्थान आणि आज चा हिन्दुस्थान ह्यात किती फरक आहे ते तुमीच ठरवा
No comments:
Post a Comment