Monday, 30 April 2012

Wrist Watches - Then and Now


Wrist Watches: Then and Now
That day I was returning from Shanghai. The air hostess was strolling shopping trolley after serving meals. There were lot of items stuffed on trolley like cosmetics, perfumes, jewelry, watches – I saw watch with brand name TRESSA which took me back in the past to my school days…
I had a watch of that company – TRESSA – it was an egg shaped dial- something unique shape in those days and I was really very much fond of that watch which was gifted to me when I was just in standard VIII.
This triggered further old memories and I tried to re-collect watches used in those good old days during the decade 1965-75. I could re-collect the famous brands of those days like HENRY SANDOZ, FAVAR LUBA etc. These imported swiss made brands were famous in those days. I remember CAMY also was one of the brands which were common household name in those days.
Most of the wrist watches used to have steel belt with which the watch was wore tightly on the wrist. People used to keep bus ticket (by making thin fold of it) in the belt so that the ticket could be easily retrieved and produced on arrival of ticket checker. Wearing a watch used to be matter of honor or pride as it was luxury in those days. Parents and relatives used to give watch as rare precious gift on passing important examination. Presenting son-in-law with costly watch during engagement or marriage ceremony was also common affair in those days.
The value of a watch was decided by jewel movement it had. Higher number for jewel movement costlier the watch! Some costlier watches used to have radium coating on its numbers and hands and we children were curious to see those shining numbers and hands in dark and we used to create artificial darkness just to see those shining things in that circular dial.
Those watches were not automatic! Everyday winding was must. If you forget winding whether it is wrist watch or table alarm watch you were sure to find that clock stopped next day! I still remember that we had a watch with roman numbers and a long chain..Similar to what Gandhiji used to have with him. One of my schoolmates had a theory that when you wind the “key” it turns back slowly and we cannot see its movement by our naked eyes. To prove his theory his advise was to put a ink blot in the slot of the “key” and watch if that blot moves back. And yes, it used to “move back”. That was fun to do that kind of experiment in those very young days.
I also remember the clocks with pendulum were common, especially in shops. These clocks had special wooden cabinet with glass in front and special compartment to keep the “key”. The key used to be similar to those used to run the moving toys. Offices had watched running on electricity. But with voltage fluctuations those were running either fast or slow and with power failure they used to die and stop working showing the time when power went off. The office attendant then was required to set time back when power resumed.
There were watch repairers also- the used to have small TAPRI type shops. The shop owner normally was seen wearing small telescope on one eye looking into the opened watch doing something with small forceps into the gears of the opened watch surrounded by glass bottles with different cleaning solvents kept into them and special smell of those solvents filling his small shop.
In Science we used to get questions – like – “why the pendulum watch run fast in summer and why slow in winter?” or “If one forgets winding why the watch stops next day?” Then giving reference of kinetic and potential energy the later question used be answered.
Monopoly of Swiss watches came to end in and around 1975 when Japanese watches like RICHO, SIEKO, CASIO, CITIZEN invaded market. Those watches were attractive, with day and date in it and most important they were automatic! There was no need to wind them daily! They were running on small battery cell! They were equally accurate and precise and there was no relation between jewel movement and accuracy. This was then extrapolated to all watches. Then came watches running on AA cells. These were fairly accurate. When cell gets over simply replace it and set the watch again and that too once in 2 or 3 months.
Watches became cheaper. Even stationary or cloth merchant started gifting watches on festive occasions. Even in photo shops one can get watches with his or with family pictures. At the same time expensive brands like TISSOT, FOSSILS flooded the market for corporate clients. Watches with eco drive were introduced.
There was a time when if somebody raise left writ and ask with right palm – it was sure that he is asking “what is the time?” Now we have mobiles, i-phones, i-pads in the market. They serve the purpose of telling time. Today wrist watches are no more luxury neither necessity. Even then today there is lot of people using wrist watches. Will future generation use wrist watches?  Only coming time will answer this question!
This all came in flash into my mind when I saw that TRESSA watch in the trolley of air hostess.  I jotted it down as my blog. Hope it took you also back in time into flash back.
Prakash Sawant

Saturday, 7 April 2012

कोणे एके काळी ...मुंबईत ... (once upon a time in Mumbai...)

कोणे एके काळी ...मुंबईत ...

कोणे एके काळी ...मुंबईत ...टांगे होते. त्यांना विक्टोरिया म्हणत. घोडा जुंपलेला टांगा टप टप करत रस्त्याने जात असे. रस्त्यावर घोड्यांची लीद, गवत पडलेले असे. त्याचा वास आसमंतात पसरलेला असे. घोडा गाड्या होत्या म्हणून घोड्यांचे तबेले होते. त्या काळी ट्राम पण होत्या. हळू हळू रस्त्यावरून मुसाफिराना घेवून जात असे. ट्राम येताना एक विशिष्ट घंटी वाजवत येत असे. त्या काळी पहा पर्यावरणाला हानी न करणारी वाहने मुंबईमध्ये अस्तित्वात होती. पनवेल, उरण, अलिबाग अशा ठिकाणी जाण्यासाठी launches होत्या. कोकणात जाण्यासाठी चौगुलेंच्या आगबोटी होत्या. समुद्र मार्गाचा परिवहनासाठी वापर होत होता. समुद्र तस्काराना स्मगलिंग साठी आंदण दिला गेलेला न्हवता. बस गाड्यांवर इंग्लिश मध्ये BEST लिहिलेले असायचे. कंडक्टर व चालकाना cap घालणे कम्पल्सरी होते. दुमजली बसमध्ये सामान ठेवण्यासाठी दरवाज्याजवळ जाळीचा stand असायचा. त्यात भाजीवाले, डबेवाले, कोळणी आणि आर्व सामान्य लोक आपापल्या घरी घेवून जाण्यासाठी घेतलेले सामान जसे पिंप, गोण्या , पोती ठेवू शकत असत आणि त्या "लगेज" चे तिकीट घ्यावे लागत असे. कालान्ताराने ते stand काढले गेले आणि त्या खबदाडीत माणसे उभी राहू लागली.  त्यावेळी बस च्या रूट ना नंबर न्हवते - A, B, C, D. E, F. G ..... असे रूट होते. एफ रूट ची बस गिरगावात जायची असे अंधुक आठवते. मुंबई वाढू लागली आणि A to Z  रूट कमी पडू लागले आणि मग 1, 2, 3, 4 असे नंबर आले. ते पण इंग्रजीत असत. नंतर BEST जे बस वर लिहिलेले असे त्याचे बेस्ट झाले आणि नंबर आणि बस चा मार्ग दाखवणारे बोर्ड मराठीत आले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे taxi चा मीटर जे भाडे दाखवी त्याप्रमाणे पैसे घेतले जात असत. वेगळी भाडे पत्रिका ठेवायाची गरज न्हवती. taxi मध्ये पण दोन प्रकार होते - छोटी taxi आणि बडी taxi. तसे का हे मला अजूनपर्यंत तरी कळले नाही. ह्या व्यतिरिक्त लाकडी स्ट्रक्चर असणार्या लोकल होत्या. रेल्वे फलाटावर म्यनुअल दर्शक होते. कुठली लोकल तेज, कुठली धीमी, कुठली कुठे थांबणार नाही हे सांगणारे लाकडी दर्शक असायची आणि त्यासाठी खास माणूस ठेवलेला असायचा - त्याचे काम त्या लाकडी दर्शकावारचे पुढच्या लोकलची वेळ सांगणारे घड्याळ सेट करायचे आणि ती लोकल तेज की धीमी ते दाखवायचे. आता इलेक्ट्रोनिक दर्शक आले आहेत. कोळशावर चालून धुरांच्या रेषा हवेत काढणाऱ्या आग गाड्या होत्या. आज त्यात रिक्षांची भर पडली आहे.

कोणे एके काळी ...मुंबईत... एक आणा, दोन आणे (चवली), चार आणे (पावली), आठ आणे अशी नाणी होती. तसेच एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, बंदा रुपया अशी नाणी होती. वेड्या माणसाला पावली कम म्हणत असत हे पण आता आठवते. आजी त्यावेळी म्हणाली होती की फार पूर्वी (इंग्रजांच्या राज्यात) काठीला सोने लावून अगदी सुरक्षित पणे मुंबईत फिरू शकत असत आणि कोणाचीही सोने चोरायची बिशाद नसायची आणि आता पुण्यात बाईक वरून साखळ्या चोरणारे सर्वत्र दिसू लागले आहेत. काही लोक असे म्हणत कि एक पैशात पान, सुपारी, तंबाकू येत असे. आता तर चार आणे पण चलनातून बाद झाले आहेत.

कोणे एके काळी मुंबईत पोलिसांचा दबदबा होता. लंडन पोलिसांनंतर मुंबई पोलिसांचा नंबर लागत असे. मुलांना घाबरवण्या साठी पोलिसांचे नाव घेतले जात असे. हप्ते बाजी होती पण मर्यादित असावी. गुन्हेगार आणि पोलीस आणि नेते ह्यांचे साटे लोटे आज जेवढे आहे तेवढे न्हवते. श्रीकांत सिनकर ह्यांच्या पोलीस तपास कथा त्यावेळी लोक आवडीने वाचत असत. रामन राघवन ने मात्र मुंबई पोलिसाना बराच चकमा दिला होता. मंदा पाटणकर मर्डर केस पण त्यावेळची गाजलेली गुन्हेगारी केस होती. प्रमोद नवलकर मुंबई चा "भटक्या" म्हणून फेमस होते.पोलीस हवालदार त्यावेळी हाफ प्यांट घालत असत - कंडक्टर, पोस्टमन लोक फूल प्यांट आणि पोलीस हाफ प्यांट. नंतर पोलिसांना खाकी रंगाची फूल प्यांट देण्यात आली - ट्राफिक हवालदारांना पांढरा शर्ट आणि दुसर्याना खाकी शर्ट देण्यात आला. हाफ प्यांट असणारा निळा ड्रेस घातलेले पोलीस किंवा पांढरा ड्रेस घातलेले ट्राफिक हवालदार आता फक्त जुन्या सिनेमातच दिसतात.

कोणे एके काळी ...मुंबईत ...  बर्याच ठिकाणी पांढर्या युनिफोर्म मधले हवालदार रहदारी नियंत्रित करत असत. त्याना सावली मिळावी म्हणून चौकात गोल किंवा चौकोनी टपरी उभी केलेली असे. खुद्द हवालदार उभा असल्याने वाहतुकीचे नियम पाळले जात असत. त्या मानाने वाहने खूप कमी होती. स्वयंचलित दिवे आले आणि मग गाड्या चालवणारे स्वयंचलित नियम बनवू लागले आणि ती पद्धत अजून चालू आहे.

कोणे एके काळी ...मुंबईत ... अंडर ग्रावुंड ग्यास पुरवठा होता. बॉम्बे ग्यास कंपनी पुरवठा करत असे. रस्त्या रस्त्या वर काच असलेले लाल रंगाचे फायर अलार्म होते. आग लागली की काच फोडायची की त्या ठिकाणी बंब हजर! पुढे पुढे टवाळकी करणारी पोरे मुद्दाम काच फोडून बंब वाले खरोखर येतात की नाही ते पाहू लागले किंवा आपल्या विभागात पाणी येण्यासाठी काच फोडू लागले आणि हे लाल रंगांचे फायर अलार्म नाहीशे झाले. त्याचप्रमाणे hydrant ज्याला आग विझवण्यासाठी भरपूर पाणी येत असे - ते पण ह्या शहराच्या वाढी मध्ये भूमिगत झाले ते कायमचेच.

कोणे एके काळी मुंबानागरी ची सीमा सायन आणि वांद्र्या पर्यंत मर्यादित होती. त्यापुढे जायचे म्हणजे बाहेरगावी जोतो असे मुंबईकर म्हणायचे. गिरणगाव हा त्या मुंबानागारीचा अविभाज्य भाग होता. गिरण्यांचे एक वेगळे विश्व त्याकाळी अस्तित्वात होते. सतत धडधडणाऱ्या गिरण्या, तीन शिफ्ट मध्ये कामावर जाणारे कामगार. नुसती गजबज चालू असायची. ह्या गिरणी कामगारांना लागणाऱ्या गोष्टी - जसे अमृत तुल्य (गुलाबी चहा, बदामी चहा, आल्याचा चहा, वेलची  चहा - त्यांच्या कप बशा पण वेगळ्या असायच्या - त्यावर शंकर विलास हॉटेल असे गुजराती मध्ये प्रिंट केलेले  असायचे ) चहाची "शंकर विलास हिंदू हॉटेल", सुपारी- तंबाखू साठी पानाच्या गाद्या, दुग्धालये, इराण्यांची हॉटेले इत्यादी.
शंकर विलास हॉटेलांमध्ये चहा पण्यासाठी नेहमी वर्दळ असायची. इराण्यांची हॉटेले कोपर्यांवर असायची - त्यांचे बन मस्का, केक, खिमा पाव, आम्लेट पाव हे खास पदार्थ आणि कटिंग चहा हा खास मेनू असायचा.
त्यांच्या हॉटेल मध्ये जूक बॉक्स असायचा - आपल्या आवडीची रेकोर्ड लावण्यासाठी. टाईम पास करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे इराण्याचे हॉटेल असे समीकरण होते - आजही आहे. थंडा मतलब कोका कोला - हो कोका कोला त्यावेळी होता - पेप्सीचा जन्म झाला न्हवता. गोल्ड स्पोट आणि फांटा पण होता. सोसयो नावाचे ड्रिंक पण प्रसिद्ध होते. "थंडा मिठा सोसयो" अशी त्याची क्याच लाईन  होती.
भोंग्याच्या आवाजावरून कुठल्या गिरणीचा भोंगा ते ओळखणारे लोक होते. भोंग्याच्या वेळे वरून घड्याळ लावले जात असे. शिफ्ट चालू आणि बंद होण्याच्या वेळी गिरणगाव जत्रे सारखे भरून जात असे. गिरणी कामगारांची एक वेगळी दुनिया होती. स्वस्थ रहाणारे शहाणे होते तसेच जीवाची मुंबई करणारे वेडेही होते. भजनी मंडळ चालवणारे होते तसेच बेवडेगिरी करणारे होते. पै पै जमवून स्वताची खोली घेणारे होते आणि एकेका खोलीत बारा बारा जण राहून साठवलेला पैसा आपल्या गावी पाठवणारे होते.  आज सुना सुना झालेला गिरणगाव पाहून ज्यांनी पूर्वीचा भरलेला गिरणगाव पाहिला आहे त्याना नक्कीच भरून येईल.

पुढे मुंबापुरी वाढली - पार बोरीवली आणि मुलुंड पर्यंत गेली - इकडे मानखुर्द पर्यंत पसरली. पण पसारा वाढायच्या आधी दलदल होती, खाचरे होती, मिठागरे होती, खाडी होती. त्यावेळी कोकणात जाताना पहिले स्टेशन ठाणे लागत असे - नंतर पनवेल - मग पेन -आणि गाडी कोकणाच्या मार्गी लागत असे. कारण त्यावेळी वाशी चा खाडी पूलच न्हवता. आता असणार्या RCF आणि HP/BP refinary चक्क शहराच्या बाहेर होत्या. इकडे कोण रहायला येणार अशी लोकांची धारणा होती. त्यामुळे मुंबईत जागा सहज मिळत होत्या. भाड्याने, पाग्डीवर पण जागा उपलब्ध होत्या. अनामत रक्कम प्रकार न्हवता. २ ते १० रुपये हि त्यावेळच्या भाड्याची रेंज होती. आपल्या नावाचा फ्ल्याट हवा असा विचार कोणाच्याच मनात नसायचा. बिल्डर आणि संडास बाथरूम असलेली ओनरशिप खोली हे शब्द अजून जन्मायचे होते. सांताक्रूझ ला विमानतळ होता. त्यापुढे पवन हंस चा प्रायवेट विमानतळ, आणि नंतर दलदलीची खाचाची मोकळी जागा.
कोण जातो मरायला तिकडे  अशी भावना. खार, सांताक्रूझ तर त्यावेळी एकदम सामसूम; त्यापुढे तबेले आणि शेते. फार काय वरळी गावातून
जेंव्हा आम्ही नागू सायाजीच्या वाडीतून चालत शाळेत जात असू तेंव्हा तिथे शेते होती आणि पायवाटेने चालत आम्ही किस्मत सिनेमा कडे बाहेर पडत असू. ती शेते व पायवाटा पाहून गावाची आठवण हमखास येत असे.


कोणे एके काळी मुंबईत सरकारी दूध मिळत असे. स्वस्त असे. वरळीच्या आणि गोरेगावच्या डेरी मधून त्याचा पुरवठा केला जात असे. त्यासाठी पत्र्याचे कार्ड खास दुधासाठी सरकारने इशू केलेले होते. त्या पत्र्याच्या कार्डवर यजमानाचे नाव, पत्ता कोरलेले असे. ते घेवून दूध केंद्रावर सकाळी किंवा दुपारी जावे लागत असे. मोठी झुंबड उडत असे. केंद्रावर असलेल्या बाईचा किंवा बाप्याचा वशिला - ओळख असेल तर मग तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. काही लोकांनी तर दूध आणण्यासाठी खास बाया, मुले, बाप्प्ये ठेवलेले होते. आज दुध एवढ्या सहज मिळत असलेले पाहून त्याकाळी आपण दुध केंद्रावर दोन बाटल्या घेण्यासाठी किती यातायात करत होतो ते  आठवले कि हसायला येते. बाटल्या  (२, ४, ६ किंवा ८) ठेवण्यासाठी खास ट्रे मिळत - ते आता पूर्णपणे नामशेष झालेत.

कोणे एके काळी ...मुंबईत फ्यामिली डॉक्टर नावाची संस्था अस्तित्वात होती. आई, बाबा, काका, आत्या - सर्वांना ह्याच डॉक्टर कडे नेले जायचे. डॉक्टर ला सर्वांचा इतिहास माहित असायचा. एखादा जास्त आजारी असेल तर डॉक्टर दवाखान्यात जाताना अथवा घरी परतताना पेशंट ला बघण्यासाठी डोकावून जात असे. जर पेशंट ला हॉस्पिटल मध्ये दाखल करायची वेळ आली कि ह्या डॉक्टर चा शब्द फायनल असायचा. एक्स्पर्ट अजून जन्मायचे होते. आज हि संस्था मरणोन्मुख आहे. ह्याचप्रमाणे टेलर पण त्याकाळी कुटूंबाचे अगदी लंगोट, चटेरी पटेरी चड्ड्या, लेंगे, शर्ट, प्यांट, सूट शिवून देत असत. रेडी मेड कपडे सहसा घेत नसत. रफू करणारे काही कारागीर त्यावेळी होते. फाटलेले कपडे अगदी अशा  सफाईदार पाने शिवून देत असत की फाटलेली जागा सहज दिसत नसे. रफा दफा होत असे - म्हणून कदाचित रफू म्हणत असावेत. त्याकाळी "कपडे फाटके असले तरी चालतील पण स्वछ असावेत " असा अलिखित दंडक होता. आज चांगली असलेली जीन ढोपरावर, ढुंगना वर मुद्दाम फाडायची फ्याशन आली आहे. आता रफू करणार्या ऐवजी उसवणारे धंधा चांगला करतील. त्या काळी खास कपडे धुण्यासाठी BAND BOX नावाची कंपनी होती! आधी मला ती बाजा पेटी वाल्यांची कंपनी वाटली होती. पण नंतर कळले की खास कपडे वाशिंग साठी खास दर असलेली ती त्या कालची एक प्रीमिअम लौंड्री कंपनी होती.

कोणे एके काळी ...मुंबईत ... तांब्या पितळेची भांडी वापरली जात असत - पत्र्याच्या बादल्या असायच्या. त्या भांड्याना कल्हई करण्याचा एक मनोरंजक कार्यक्रम व्हायचा - तो पहाण्यासाठी आम्ही पोरे टोरे कल्हई वाल्या समोर गोल करून उभे रहात असू. मलूल झालेली भांडी कल्हई झाल्यावर कशी चमकदार नव्या सारखी व्हायची . पत्र्याच्या बादली ला तळ लावणे, कडी लावणे ह्या गोष्टी मध्ये कारागिराचे कौशल्य पहाण्यात मजा येत असे. पुढे जर्मन - अल्युमिनिअम, स्टील , प्लास्टिक ची भांडी आली आणि हे कारागीर बेरोजगार झाले - नामशेष झाले.

कोणे एके काळी ...मुंबईत... लुंगी घालण्याची फ्याशन आली होती. मुंबई आहे कि मद्रास आहे अशे कन्फ्युजन होवू  लागले होते. फक्त फरक एवढाच कि मुंबई मध्ये रंगीबेरंगी लुंग्या होत्या. घरात, रस्त्यावर, शेजारी जाण्यासाठी, जवळच्या दुकानात जाण्यासाठी लुंगी वापरली जात होती. काही मुली तर महाविद्यालायामध्ये लुंगी घालून येत असत. एवढेच काय मुंबईच्या चाकरमान्यांनी लुंगी ची फ्याशन खेडोपाडी नेली होती! जशी डोळ्यांची साथ येते आणि निघून जाते (ती पण एकदा मोठ्या प्रमाणावर मुंबईत आली होती) तशीच लुंगी ची साथ पण निघून गेली. शिवसेनेने " बजाव पुंगी हटाव लुंगी" अशी घोषणा देवून आंदोलन सुरु केले त्याचा परिणाम असावा कदाचित.

कोणे एके काळी ...मुंबईत... झोळी वापरायची फ्याशन आली होती. जिकडे बघावे तिकडे झोळ्या! शाळेत जाणारी मुले घेतली झोळी चालले शाळेत. कोलेज ला जाणारे पण झोळी वाले - भिकारी की विद्यार्थी ह्यातला फरक कळत नसे. ऑफिस ला जाणारे पण झोळी वापरत असत. फक्त कवींची मक्तेदारी असणारी झोळी सर्वांची मालमत्ता झाली होती त्या काळी! झोळ्यांचे पण विविध प्रकार होते. साध्या झोळ्या - झालर वाल्या झोळ्या, फुले लावलेल्या झोळ्या, नक्षी काम केलेल्या झोळ्या - झोळ्यांची फ्याशन पण काळाच्या उदरात गडप झाली.


कोणे एके काळी ...मुंबईत सिनेमागृहात पिक्चर २५-२५ आठवडे चालत असे. तिकिटांचे बुकिंग केले जात असे. लोक तासोन तास रांगेत उभे रहात असत. शेवटचा उपाय म्हणजे काळा बाजारात तिकीट खरेदी केले जात असे. त्यावरून मारामारी होत असे - खून खराबा होत असे. चांगले जुने पिक्चर्स स्वस्तात matinee ला लागत असत. कोलेज कुमार हमखास हे शो पहायला पडीक असत. बुर्हापुराण वाला  त्या काळी पिक्चर च्या गाण्यांची  हातात मावतील एवढी phamplet विकत असे आणि ती विकली पण जात असत.  चांगली नाटके होती - नाटक कार होते. काही लोकांसाठी मटका होता. रतन खत्री मटका किंग होता. अनपढ माणसे पण मटका लावताना कशी कोण जाणे पण फटाफट क्याल्कुलेशन करत असत. एरवी एखादे गणित विचारले तर ह्याना येत नसे - त्यांची माती गुंग होत असे..पण आकडा लावण्यासाठी कागदाच्या छोट्या तुकड्यावर मोठी आकडेमोड मात्र हीच लोक पटापट करू शकत असत! विशिष्ट वर्गा साठी म्हणे कुलाबा आणि चर्च गेट एरिया मध्ये क्याब्रे बार होते म्हणे.

कोणे एके काळी ...मुंबईत... मुलांसाठी मैदाने होती - बाग बगीचे होते. त्या वेळी रस्त्यावर माकड खेळ करणारे डोंबारी येत असत. डोंबारी लोकांचे रविवारी खास खेळ असायचे - दोरीवरून चालणे, तान्ह्या मुलांना काठीच्या टोकावर ठेवून हातावर, हनुवटीवर तोलणे, कुत्र्याला आगीतून उडी मारायला लावणे, दहा वर्षाच्या मुलाला पेटीत कोंबणे - अदृश्य  करणे. असे खेळ चालत. दरवेशी अस्वल घेवून येत. अस्वलांचा उडया मारण्या चा खेळ दाखवत आणि अस्वलाचा केस ताईता मध्ये बांधून देण्याचा धंदा करत. अस्वलाच्या केसाने भूत प्रेताची बाधा होत नाही अशी समजूत होती! काही लोक सिनेमा घेवून येत. पाच पैसे देवून काचेच्या होल मधून चित्रे दाखवण्याचा सिनेमा! त्याचे पण जबरदस्त आकर्षण असायचे. रात्री थकलेल्या चाकरमान्यांचे श्रम हलके करण्यासाठी रंगीत तेलांच्या बाटल्या घेवून मालिशवाले फिरायाचे आणि चंपी तेल मालिश करून द्यायचे. दुपारच्या वेळी कान कोरणारे आणि त्याचबरोबर अत्तराचा धंदा करणारे मुंबईकरांची सेवा करत असत. मनोरंजनाची आणि टाईम पास करण्याची ही  त्या वेळची काही साधने होती ती ही अशी होती.

त्या कालचे महत्त्वाचे मनोरंजनाचे साधन म्हणजे रेडिओ. त्याकाळचे लाकडी फ्रेम मध्ये बसवलेले रेडिओ दोन  दोन  माणसांना उचलत नसत. रेडिओ ऑन केला की आवाज ऐकू यायला दोन मिनिटे लागायची. वाल्व चे रेडिओ असायचे - गरम होण्यास वेळ लागायचा. हिरव्या रंगाचा magic eye  असायचा - स्टेशन लागल्यावर पूर्ण हिरवा व्हायचा. क्रॉस च्या आकाराच्या एरीअल असायच्या. रडिओ वापरण्यासाठी लायसन्स लागायचे. सरकारी अधिकारी ते लायसन्स बघायला - चेक करायला यायचे. लायसन्सची फी भरली की नाही ते चेक करायचे. जणू काही वापरणारा सामान्य माणूस घरून स्वताचे रेडिओ स्टेशन चालवणार आहे. एको - मर्फी हे प्रसिद्ध त्यावेळचे ब्रांड. मुंबई ब केंद्रावरचे प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे : पुन्हा प्रपंच (टेकाडे भावोजी  - मीनावहीनी) , मुलांसाठी गम्मत जम्मत, कामगार सभा, आपली आवड, श्रुतिका इत्यादि. पुढे काही दिवसांनी सॉलिड स्टेट तंत्रन्यान आले - transistor आले - रेडिओ चा आकार गळ्यात घालण्या इतका छोटा झाला. लायसन्स रद्द झाले. झोपड्यांमध्ये पण transistor आले. चाकरमानी ते आणि क्यामेरा गळ्यात घालून गावी जाताना मिरवताना दिसू लागले. आग्फा चे क्यामेरे त्यावेळी प्रसिद्ध होते. पुढे ७१-७२ साली टी वी आले. त्यावेळी मुंबईचा टीवी टॉवर एक प्रेक्षणीय स्थळ झाले होते. त्या टॉवर ची उंची पहाता डोक्यावरची टोपी खाली पडत असे. गांधी जयंती ला कृष्ण धवल दूरदर्शन सुरू झाले. सायंकाळी ७ ते १० असा वेळ असायचा. बातम्या, छायागीत, आणि सिनेमे हे त्यावेळचे आकर्षणे होती. Telerad, Televista, EC, Crown, Standard, Weston, Nikky Taashaa असे टीवी ब्रांड बाजारात उपलब्ध होते. त्यावेळी वाऱ्या वरची वरात , दिवा जळू दे सारी रात, बटाट्याची चाळ असे सुंदर मराठी कार्यक्रम त्यावेळी प्रेक्षकाना दाखवले गेले. पुढे हम लोग, ये जो ही जिंदगी, रजनी, रामायण - महाभारत अशा सिरीयल दूरदर्शन गाजवून गेल्या.

मुलाना खाण्यासाठी त्याकाळी विविध प्रकार उपलब्ध होते. गुळाचे चिकट, ओठ रंगवायची लाली, आईस क्यांडी, बर्फाचे गोळे आणि त्यावर टाकायचे वेगवेगळे रंग, गोल थंड गोळे, चणे, भेल, शेंगदाणे, चना दाल, कुरमुरे, चिक्की, रावळगाव, लेमन च्या गोळ्या, पेपर मिंट च्या गोळ्या. त्यावेळी जॉय आईस क्रीम खूप फेमस होते. आईस क्रीम फक्त पिक्चर ला गेल्यावर - ते पण मोठ्यांची कृपा दृष्टी असेल तरच. cadbury केंव्हातरी - बर्फी हलवा पगाराच्या दिवशी. त्या काळी बिस्कीट चे पुड्यांचे पण स्पेशल प्याकिंग असायचे - आत निदान दोन कार्डबोर्ड चे थर असायचे. साठे, पार्ले आणि ब्रिटानिया हे प्रसिद्ध ब्रांड होते. नकली बिस्किटे मिळायची - ती माती सारखी लागायची - फेकून दिली जायची - भिकार्याना दिलेल्या भाकर्या - चापात्यांपासून ती बनवतात अशी अफवा ही त्या काळी पसरलेली होती.

कोणे एके काळी ...मुंबईत... मुलांसाठी मैदाने होती आणि मुले तेथे खेळत असत. कबड्डी, उभा खो खो, बैठा खो खो, डब्बा ऐस पैस, लगोरी, पकडा पकडी, चोर पोलीस, गोटया (राजा-राणी, कोयबा, कान घाशी), क्रिकेट, गोल लोखंडी - छत्रीची तार लावून चालवायच्या गाड्या, सायकली चालवण्याच्या स्पर्धा, विटी दांडू, पतंग उडवणे  किती तरी खेळ खेळले जायचे. कटलेले पतंग पकडण्यासाठी बेभान धावणारे गच्ची वरून पडलेले, रुळावरून धावताना गाडी खाली सापडलेले अशा अनेक भयावह बातम्या पेपर मध्ये वाचलेल्या आठवतात. बदामी मांजा, गुलाबी मांजा, घासलेती मांजा आणि त्यासाठी लागणार्या फिरक्या. पतंग बदवणारा, उडवणारा आणि त्याला साथ देण्यासाठी फिरकी पकडणारा आणि मांजा गुंडाळणारा असा पतंग उडवण्यासाठी चा जामानिजा असे.  "कणी कापणे", फिरक्या घेणे" , "लपेटणे" हे वाक्प्रचार पतंगाच्या खेळातून साहित्यात आले असावेत.  लागले-पडले तर माती नाही तर लाल औषध लावले जायचे. मार दिला - मार घेतला जायचा. जिंकणे - हरण्या वरून मित्रांची मारामारी व्हायची - ती मिटवली जायची - पुन्हा दुसर्या दिवशी तोच खेळ, तीच स्पर्धा, तीच बोंबाबोंब आणि तीच मारामारी. क्रिकेट मध्ये मर्यादित षटकांचे सामने असायचे. प्रसंगानुसार त्याचे नियम बदलले जायचे. आजच्या IPL ची बीजे त्यावेळच्या आमच्या क्रिकेट च्या खेळामध्ये सामावलेली आहेत. पुढे क्रिकेट चे वर्चस्व एवढे वाढले कि मिळाली जागा - खेळ क्रिकेट अशी परिस्थिती आली. व्हरांडे - बाल्कनी मध्ये पण क्रिकेट खेळ ले जावू लागले. हे झाले मैदानी खेळ. बैठे खेळ - क्यारम, पत्ते (रमी, तीन पत्ते, पाच तीन दोन, मेंढी कोट), चेस, साप शिडी इत्यादी. लेझीम नावाचा एक प्रकार होता. त्यामध्ये पण सर्व अंगाचा व्यायाम होत असे. लाठ्या काठ्या हा स्वता: च्या सुरक्षिततेसाठी फार चांगला खेळ होता. त्या वेळी डबल बार खूपशा मैदानामध्ये असे. त्यावर दंडाचे व्यायाम केले जात. मल्लखांब करणारे लवचिक अंगकाठी कमवत असत. आज लेझीम, मल्लखांब, डबल बार antique म्हणून म्युझिअम मध्ये पण बघायला मिळतील की नाही याची शंका आहे.

कोणे एकी काळी मुंबईत शाळेच्या पिकनिक राणीचा बाग, तानसा तलाव, आरे ची दूध डेअरी, पवई तलाव, वज्रेश्वरी, मानखुर्दच्या आसपास असणारी मिठागरे अशा ठिकाणी जायच्या. हि ठिकाणे पण त्याकाळी दूर दूर वाटायची. आज हि सर्व मुंबईचा हिस्सा आहेत. त्या काळी मुंबई छोटी होती, सुंदर होती, स्वच्छ होती. हिरवी होती. आज बकाल झाली आहे. त्याकाळी सर्व प्रदेशातले लोक इथे गुण्या गोविंदाने नांदत होते. भैया, सिंधी, मद्रासी, मल्लू, तेलगु, पंजाबी, बंगाली, आसामी, गुजराथी, मुस्लीम   - सगळे आपापली संस्कृती जपून एकत्र रहात होते. मराठी - अमराठी असा वाद न्हवता. राजकारणी खाबू झाले न्हवते. कधीही कुठेही सहज बिनघोर जाता येत असे. स्फोट होईल अशी टांगती तलवार नसायची. ट्राफिक कमी होता. गाड्या असण्याचा माज न्हवता. मुंबई आपली वाटायची - आज ती बकाल झाली आहे. लोकसंख्या बेसुमार वाढली. झोपडपट्ट्या वाढल्या आहेत. फ्लाय ओवर झाले आहेत - एके काळी सरावाने वावरलेल्या जुन्या माणसाला इथे आता बावरून जायला होते. एखादा जुना बालपणीचा मित्र खूप दिवसांनी - म्हणजे मोठेपणी भेटावा आणि त्या भेटीत ती जुनी पूर्वीची ओढ येण्या ऐवजी अलिप्त पणा यावा तसे वाटते. प्रत्येकाला मुंबईत यायचे आहे. प्रत्येकाला मुंबई हवी आहे. आज मुंबई राजकारण्यांची, स्मगलारांची, बिल्डरांची, धनिकांची बटिक वाटते - परकी वाटते - कोण्या एके काळी मुंबई अशी होती ही कल्पनेतली कथा वाटते.

प्रकाश सावंत 

Sunday, 1 April 2012

मला भावलेला चित्रपट : मेरे अपने

मेरे अपने - सिप्पी पिक्चर्स  ने १९७१ मध्ये रिलीज केलेला चित्रपट. त्यावेळी हा चित्रपट मी रस्त्यावर पहिला होता. रस्त्यावर म्हणजे त्यावेळी चाळी मध्ये रहात होतो - दीलाइल रोड ला संभाजी नगर मध्ये रहात होतो. चाळी मध्ये  पूजा असली, काही कार्यक्रम असला की संध्याकाळी व्याख्याने, रेकोर्ड डान्स अथवा चित्रपट ठेवला जात असे. व्याख्यान असेल तर त्याला फार कमी प्रतिसाद असे, रेकोर्ड डान्स ला बर्यापैकी गर्दी जमे पण चित्रपट असला की मैदान होऊस्फुल ! सन्ध्याकाळी ८ वाजल्यापासून आपापल्या जागा अडवण्याची स्पर्धा सुरू होत असे. तर अशा एका कार्यक्रमात मी मेरे अपने पाहिला - अर्थात black and white.

खरे म्हणजे मला हा पिक्चर पहायाचा न्हवता - एखाद तास बसू आणि निघून  येवू असा सरळ विचार होता. कारण ७० च्या त्या दशकात राजेश खन्ना चा   जबरदस्त पगडा सर्वांवर होता. राजेश खन्ना नसलेला पिक्चर आम्हाला अळणी वाटायचा. पिक्चर बघितला असे वाटायचेच नाही. आणि ह्या मेरे अपने मध्ये तर मीना कुमारी, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा असे आमच्या नावडीचे कलाकार. तरी पण तो पिक्चर मी टाईम पास म्हणून पहायाचे ठरवले . आश्चर्य म्हणजे मी हा पिक्चर अगदी पूर्ण पाहिला. त्या पिक्चरने शेवट पर्यंत जखडून ठेवले. एक चांगला चित्रपट  काय आणि कसा असतो ते त्या वेळी कळले.  त्या चित्रपटाने एक वेगळाच ठसा माझ्या बालमनावर त्यावेळी उठवला तो अजून कायम आहे.

आज मागे वळून  पहिले तर मी म्हणेन की हा पहिला gang war चित्रपट असावा. त्यावेळी गल्लोगल्ली असणार्या छोट्या छोट्या ग्यांग मध्ये चालणार्या मारामार्या ह्या चित्रपटामध्ये परिणामकारक रीत्या दाखवल्या होत्या. तरुण मुले वाम मार्गाला का वळतात त्याचे अतिशय सुंदर चित्रण गुलजार ह्यांनी ह्या चित्रात केले आहे. सामाजिक स्थिती, ग्रजूएट मुलाला नोकरी नसल्याने घरून मिळणारे टोमणे, प्रेयसी ने नोकरी लागायची वाट पाहोन शेवटी दिलेला नकार, त्यातून आलेले वैफल्य, व्यापाऱ्यांचा काळा बाजार,  नोकरीतली वशिलेबाजी, लाच घेणारे पोलीस, नेत्यांचा स्वार्थ आणि बेकार तरुणांना वापरून घेण्याची वृत्ती, प्रामाणिक पणाचा पराजय - ह्या सर्व गोष्टींचे वास्तव वादी सादरीकरण गुलजार ह्यांनी उत्तम रीतीने केले आहे.

आनंदी नावाच्या म्हातारीला(मीना कुमारी)  अरुण (रमेश देव)  गावाहून शहरात घेवून येतो - तिला इकडे आल्यावर कळते कि ती त्याची कोणी नातेवाईक नसते तर अरुण ने तिला घरकामासाठी आणले असते. फसवल्याची जाणीव झाल्यावर आनंदी दु:खी होते आणि अरुण चे घर सोडून जाते - ती श्याम (विनोद खन्ना) च्या आश्रयाला येते -  जो नोकरी नसल्याने घरच्यांच्या टोमण्यांनी हैराण होवून आणि प्रेयसीने नकार दिल्याने निराश होवून घर सोडून एका पडक्या वाड्यात रहात असतो. त्याच्याबरोबर त्यांच्या बेकार मित्रांची ग्यांग असते. दुसर्या गल्लीतला त्याचा दुश्मन म्हणजे छैनू (शत्रुघ सिन्हा) - त्याची पण आपली एक ग्यांग असते. ह्या दोन पार्टी तला संघर्षाची कथा म्हणजे मेरे अपने. ह्यातल्या बेकार तरुणांची घरे दारे असतात, नातेवाईक असतात, आनंदी कोणाची कोण असते - ती श्याम च्या टोळी ला जीव लावते तसेच ती छैनू च्या टोळी ला पण जीव लावते. शेवटी ती दोन टोळ्यांचा समेट करण्याचा प्रयत्न करते - पण पोलिसांची गोळी लागून प्राणाला मुकते. कोण - कोणाची कोण त्यांची "मेरे अपने" झालेली असते. दोन्ही टोळ्या आणि त्यांचे नायक शेवटी भावूक होतात - काय मिळवले ह्याचा हिशेब करत जेल मध्ये जातात. आनंदी चे प्रेत मुनिसिपाल्टची गाडी बेवारस म्हणून घेवून जाते.

विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा चे काम खूप छान झाले आहे. श्याम तर पिक्चर संपला तरी मनातून बाहेर जात नाही. Dany Dangzopa आणि पेंटल खूपच तरुण आहेत. बहुतेक त्यांचा पहिला पिक्चर असावा.

ह्यातली दोन गाणी कानात गुंजत रहातात. " कोई होता जिसको अपना" हे तर टायटल सॉंग आहे. त्याच बरोबर श्याम ची टोळीवर चित्रित केलेले " हालचाल ठीक ठाक है" हे गीत तर खूप छान चित्रित केले आहे - तरुणांची विमनस्कता ह्या गाण्या द्वारे फार प्रभावी रीत्या  दाखवलेली आहे.

आज हा पिक्चर एखाद्या च्यानेल वर लागला तरी मी पहातो. कंटाळा येत नाही. all time favorite पैकी हा एक पिक्चर आहे. आपण पण जरूर  पहा.

प्रकाश सावंत 

Friday, 30 March 2012

यंत्रयुग

यंत्रयुग आणि आधुनिकीकरण आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. ह्याबद्दल आमचा एक दिवस अड्डा जमला होता त्यावेळी बरीच चर्चा झाली.

पूर्वी घरोघरी विहिरी होत्या. गावागावात होत्या. मुंबई मध्ये होत्या. पुण्यात वाड्यांमध्ये होत्या. विहिरीतून पाणी काढताना जबरदस्त व्यायाम होत असे. आज विहिरी असतील तर त्यावर पंप लावले गेले. बोरवेल काढल्या गेल्या. पाणी भरताना करावी लागणारी मेहनत संपली. शहरामध्ये घरोघरी नळ आले. त्यामानाने अजून बर्याच ठिकाणी विहिरी अस्तित्वात आहेत आणि "नाईलाज को क्या इलाज" म्हणून काही लोकांना त्या वापराव्या लागत आहेत. बऱ्याच लोकनी आता विहिरींवर पंप बसवले आहेत.

एके काळी जाते दळण्यासाठी वापरले जात असे. कमीत कमी एक तास जात्यावर मेहनत केली की पीठ निघत असे. त्यानंतर गल्लोगल्ली पिठाच्या गिरण्या आल्या. घरातली जाती केंव्हा दिसेनाशी झाली कळलेच नाही. मध्यंतरी घरात गहू दळण्यासाठी छोट्या गिरण्या आल्या होत्या व अजूनही आहेत. त्या फारशा प्रसिद्ध झाल्या नाहीत - कदाचित शेजारी अथवा खाली रहाणारे शेजार् च्या लोकांनी तक्रार करून उबग आणला असेल. आता तर पिठाच्या गिरण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रेडीमेड आटा आता वाण्याच्या दुकानात मिळू लागला आहे. पुढ्या पिढीला पिठाच्या गिरण्या होत्या आणि त्यावर लोक गहू घेवून दालायाला जात होते हे सांगितले तर विश्वास बसणार नाही.  आता पिठाच्या गिरण्यांचे फोटो काढून ठेवायला हवेत.

दळप गेले - कांडप पण गेले. गावच्या घरात उखळ असे. त्यात मुसळ घालून हाताने कांडप केले जात असे. शहरात रहाणाऱ्या मुलांना जाते आणि उखळ सिनेमा किंवा विडीयो मध्ये दाखवावे लागेल. प्रत्येक घरात असणारा पाटा आणि वरवंटा किंवा रगडा पण आता इतिहास जमा होण्याची वेळ आलेली आहे. जाते, उखळ, पाटा, वरवंटा ह्यांची रवानगी  आता मागल्या दारी किंवा परसदारी झालेली दिसते. मिक्सर आता गावोगावी दिसू लागले आहेत.

धुणी धुण्यासाठी कोसभर लांब नदी वर जावे लागत असे. तिथे दगडावर आपटून व रगडून कपडे धुवावे लागत असत. कपड्यातले पाणी काढण्यासाठी ते जबरदस्त पिळावे लागत असत आणि मग घरी आणून सुकण्यासाठी दोरीवर टाकावे लागत असत. आता वाशिंग मशीन ने हे सर्व श्रम संपवून टाकले आहेत.

किचन चा ओटा नावाचा प्रकार पूर्वी न्हवताच मुळी. चुली अथवा स्टोव असायाचा. चूल असेल तर ती पेटवण्यासाठी फुंकणी फुकून गाल दुखू लागत असत. चूल खाली - डबे वरती - अशी सारखी उठ बस करावी लागत असे. आता ओटे आले. ग्यास आले. उभ राहून स्वयंपाक करायची पद्धत आली.

शेतात नांगर चालवणे, मोट ओढणे, जमीन करणे, जमीन चोपणे व सपाट करणे, पेरणी करणे अशी अनेक कामे श्रमाची होती. अजून ही होत असतील. पण आता यंत्रांचा वापर शेती मध्ये सुरु झाला.

आज गावामध्ये सुट्टीत गेले की आपण ह्या यंत्रांच्या किती स्वाधीन झालो आहोत ह्याची जाणीव लाईट गेल्यावर होते! पंखे बंद, मिक्सर बंद, गिझर बंद, दूरदर्शन बंद, आकाशवाणी बंद, पिठाची गिरणी बंद, मोटार व बाईक रीपारिंग बंद, सायकल मध्ये हवा भरणाऱ्या  अन्नाचे दुकान  बंद, घरात पाणी बंद.

गावात असे तर शहरात काय? रेल्वे बंद. कंपन्या बंद. उत्पादन बंद. ट्राम बंद. प्रेस बंद. जीवन ठप्प.

मग आठवते आपण पूर्वी कसे दिवस काढले? आपल्या पूर्वजांनी कसे सारे जमवून नेले ? हा सवयीचा परिणाम?  कधी कधी असे वाटते की ही यंत्र म्हणतील कि " आम्ही कोण म्हणूनि काय पुसता दांताड वेंगाडुनी?" किंवा "आम्हाला वगळा हतप्रभ झणी होतील यान्त्रांगणे - आम्हाला वगळा होईल कवडीमोल तुमचे जिणे किंवा होईल कष्टाचे तुमचे जिणे  "

इति श्री यंत्र युग पुराण समाप्त

प्रकाश सावंत

Sunday, 25 March 2012

Wrist Watches - Then and Now

त्या दिवशी मी शांघाई वरून परतत होतो. विमानामध्ये in-house shopping ची गाडी घेवून हवाई सुंदरी फिरत होती. त्यात मी ट्रेसा कंपनी चे घड्याळ पाहिले आणि मन भूतकाळात गेले.

१९६५ ते १९७५ चे दशक. त्या काळी मला आठवतात ती घरात वडिलांकडे - काकांकडे असणारी चावी ची घड्याळे. Henri Sandoz, Favar Luba कंपनीची. त्या वेळचे हे फेमस ब्रान्ड! त्याच दरम्यान TRESSA brand असल्याचे आठवते - ह्या कंपनीचे अंडा डायल असलेले घड्याळ माझ्याकडे होते. ते मी शाळेत घालून जात असे.

चावी रोज द्यावी लागायची ह्या घड्याळांना - नाहीतर दुसऱ्या दिवशी बंद! अरे - चावी द्यायला विसरलो वाटते रात्री - हा मग नेहमीचा dialogue. अलार्म च्या घड्यालाना पण चावी द्यावी लागायाची - नाहीतर सकाळचा उठायचा कार्यक्रम ओम फस्स. आमच्या घरी गांधीजी वापरायचे तसले रोमन अंक असलेले - कमरेला लावायाचे घड्याळ असलेले अजून आठवते. आमचा एक मित्र म्हणायचा की एकदा चावी दिली की ती उलटी फिरत असते. पुरावा म्हणून आम्ही फौंटन पेन ची शाई घड्याळाच्या चावीच्या खाचीत घालायचो आणी तो शाईचा टिपका उलटा फिरला की आमच्या मित्राची थियरी सिद्ध होत असे.

दुकानांमध्ये लंबकाची घड्याळे असायची - घरात भिंतीवर लावायची - लंबक नसलेली पण असायची - पण त्यांना रोज चावी द्यावी लागायची - चावी घड्याळाच्या खोक्यात ठेवायची सोय असायची.  त्यावेळी imported brand जास्त फेमस होते. CAMY हा एक local brand आठवतो. त्यावेळी घड्याळ असणे एक प्रतिष्टा असणारी बाब होती. लग्न असले की सासरे बुवांकडून हमखास घड्याळ भेट म्हणून मिळायचे. परीक्षा चांगल्या मार्कानी पास झाले की आई - बाबा - काका - मामा कडून घड्याळ भेट मिळणे म्हणजे एक मिरवायची गोष्ट होती. त्यावेळी घड्याळे मनगटावर घट्ट बांधायची प्रथा होती. त्या पट्ट्यात बसची तिकीटे सुरळी करून ठेवायची पध्धत होती. TC आल्यावर पटकन तिकीट मिळावे त्याची हि एक सोय होती. त्यावेळच्या घडयाळा मध्ये jewel movement असायाची - जेवढे ज्वेल जास्त तेवढी घड्याळे जास्त प्रिसाईज व महाग. रेडियम असलेल्या घड्यांची ऐट काही विचारू नका. एखाद्याच्या घड्याळात रेडियम असेल तर कृत्रिम अंधार करून चमकणारे नंबर आणी काटे पहायची आमची धडपड अजून ही आठवते

अशी घड्याळे होती त्यामुळे घड्याळ दुरुस्त करणारे घड्यालजी पण होते. त्यांची दुकाने मोठी पण होती आणि छोटे टपरीवजा पण होती. त्यात वेगवेगळे द्रव भरलेल्या बाटल्या असायचा. त्या द्रावांचा विशिष्ट वास नाकात भरायचा. घड्यालजी  च्या डोळ्याला छोटी दुर्बीण लावलेली असायची आणि ती लावून तो घड्याळ दुरुस्त करत बसलेला असायचा. ती घड्याळे गेली आणि घड्यालाजींची जमात नामशेष झाली.

त्या काळी एखाद्याचे घड्याळ जुने झाले की म्हणायाचे " चुन्याची डबी बदलून टाक" - प्लास्टिक चा जमाना येण्याच्या आधी स्टील ची घड्याळाच्या आकाराची डबी चुण्यासाठी किंवा तपकीर ठेवायाला वापरली जात असे. वेळ बरोबर न दाखवणाऱ्या घड्याळाला चुन्याची डबी म्हणत त्यात नवल काय?

घड्याळा विषयी गणितात प्रश्न यायाचे - " लंबक असलेली घड्याळे उन्हाळ्यात पुढे का जातात आणि थंडीत मागे का पडतात?" किंवा "एखादे दिवशी चावी न दिल्यास घड्याळ बंद का पडते?" - गतीज आणी स्थिथीज उर्जे चा हवाला देवून त्याचे उत्तर द्यावे लागत असे!

Swiss घड्याळांची मोनोपोली ७० च्या दशकात - जपानी घड्याळे आल्या वर संपुष्टात आली. पूवी फक्त तारीख असणारी घड्याळे होती. जपान्यांनी तारीख आणि वार असणारी आणली. त्यांची घड्याळे automatic होती. चावी न देण्याची नवलाई त्या घड्याळांमध्ये होती. सेल वर चालणारी होती. फक्त हाताच्या movement वर चालणारी होती!  CASIO, RICHO, SEIKO अशी घड्याळे बाजारात आली. ढिला पट्टा बांधायची fashion  आली.  चावी देण्याची घड्याळे नामशेष झाली. नंतर electricity वर चालणारी घड्याळे आली. पण त्यात एक प्रोब्लेम असायचा. लाईट गेली कि घड्याळ बंद! voltage च्या क्षमते प्रमाणे ती पुढे - मागे व्हायची आणि परत परत सारखी वेळ लावावी लागायची. काळाच्या ओघात चावी वर चालणारी - लाईट वर चालणारी घड्याळे दिसेनाशी झाली. आता सेल वर चालणारी घड्याळे आली - जी एकदा सेल घातला की निदान दोन महिने तरी चालतात. सेल जाईल तेव्हा - नवीन सेल टाकायचा आणि वेळ लावायची. आजच्या पिढीला चावीची किंवा लाईट वर चालणारी घड्याळे होती ही एक सुरस गोष्ट वाटेल. आज इको घड्याळे आली. किंबहुना आता मोबाईल आल्यापासून घड्याळे वापरणारे कमी झालेत.

तसेच आता महागडी घड्याळे वापरणारे कॉर्पोरेट लोक निर्माण झाले आहेत. स्कुबा डायविंग करणारे वेगळी घड्याळे वापरू लागले आहेत. नवीन ब्रांड आले आहेत. Fossils, Tissot, Swatch, असे नवे नवे ब्रांड बाजारात दिसू लागले आहेत. येरे गबाळे पण आता घड्याळे बनवू लागले आहेत. स्टेशनरी विकणारा, कापड चोपड विकणारा पण आता नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून आपल्या दुकानाचे नाव टाकून घड्याळ देवू लागला आहे. तुमचा - तुमच्या कुटुंबाचा फोटो असणारी घड्याळे आता मिळू लागली आहेत. आता घड्याळे कॉमन झाली आहेत. त्यांचे स्पेशल असणे संपले आहे.

नुसते डावे मनगट वर करून त्यावर उजव्या हाताच्या बोटाने खूण करून मान हलवली तरी समोरच्याला कळायचे की हा माणूस टाईम विचारतो आहे. आज हि गोष्ट एवढी कॉमन राहिली नाही. येणाऱ्या पुढच्या काळात मनगटी घड्याळांची उपयुक्तता रहाणार की नाही - त्याचे उत्तर येणारा कालच  देईल.

विमानात Tressa कंपनीचे घड्याळ बघून मला हे सर्व रामायण आठवले आणी ते मी इथे लिहून काढले. आशा आहे कि तुम्हाला पण flash back मध्ये घेवून जाण्यात मी यशस्वी झालो असेन.

प्रकाश सावंत

Wednesday, 22 June 2011

I want to go to school once again.... (Marathi Poem)

Hi All

I want to share this poem composed by someone with everyone. This is actually sent to me by my school friend Anil Kadam. Thanks to Anil and thanks to the person who composed it. I am just a mediator.


मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन
नळाखाली हात धरुनच पाणी प्यायचय,
कसाबसा डबा संपवत..तिखट-मीठ लावलेल्या
चिंचा-बोरं-पेरू-काकडी सगळं खायचय,
सायकलच्या चाकाला स्टंप धरुन
खोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,
उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठी ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

घंटा व्हायची वाट बघत का असेना
मित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,
घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करुन
सायकलची रेस लावुनच घरी पोचायचय,
खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्या
दोन तारांमधुन निघुन बाहेर पळायचय,
ती पळुन जायची मजा अनुभवायला ....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतच
सहामाही परिक्षेचा अभ्यास करायचाय,
दिवसभर किल्ला बांधत मातीत लोळुन पण
हात न धुता फराळाच्या ताटावर बसायचय,
आदल्या रात्री कितीही फटाके उडवले तरी
त्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचय,
सुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

कितीही जड असू दे.. जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराचंच ओझं पाठिवर वागवायचय,
कितीही उकडत असू दे.. वातानुकुलित ऑफिसपेक्षा
पंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडुन बसायचय,
कितीही तुटका असू दे... ऑफिसातल्या एकट्या खुर्चीपेक्षा
दोघांच्या बाकावर ३ मित्रांनी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ
आता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंय,
तो बरोबर आहे का हे सरांना विचारायला....
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय

Saturday, 11 June 2011

TRAFFIC SENSE

Between end May and June 11 eminent personalities passed away. Neelam Prabu (Karuna Dev), M F Hussain, Ramesh Kanjle (MNS MLA) and Vimal Kumar Jain from Kumar properties. M F and Neelam Prabhu had completed their inning and passed away out of old age while death of Vimal Jain and Ramesh Janjle was touching. Ramesh died of heart attack and Vimal died in accident. It was tragic accident. He was driving in Mercedes with Mr. Ingle, Mr. Sapre and his driver on Nigdi Bridge while they were driving on right side and at slow speed the speeding tanker coming from opposite direction rammed into their car crossing the divider. The driver of the tanker perhaps had lost control or tanker brakes might have failed. Whatever it is but these people in the car became victim of the tragic death for no mistake of theirs. They must have planned so many things for that day and also for years to come. All vanished into the thin air with their on the spot death. Man proposes and God disposes.  Police will report accidental death. The tanker driver will be arrested and perhaps will get released on bail or perhaps will face imprisonment for several years and will come out. But what about the loss that the families of victims have to suffer? Who will compensate?

The rate of accidents is alarming in Pune. It is not only Pune but also allover India now. What are the reasons for this? People see accident, get sentimental, and decide themselves to take care but it all lasts for few days and all again everyone is back to normal chaos. Why?

According to me there are certain reasons for this – indiscipline, attitude, mentality, system and corruptions and loop holes in the systems, no fear of law, delayed court decisions are some of the prominent reasons.

Indiscipline is marinated in our blood. Everyone wants to be privileged one i.e. law is for others and not for me. Others should follow discipline and not me. That is the attitude and mentality. How we behave in public places – just have a look at it and you will realize how we follow civil etiquettes.  We throw garbage anywhere, we spit, and we urinate.  Dust bins are show pieces kept on road. There are municipality workers and sweepers who are there and paid for cleaning the roads next day morning – I am paying taxes and I am authorized to throw garbage on road. I am free to write anything on wall of public places, buses, theater seats.

Same is the case with traffic. Do we follow discipline? Do we follow traffic lights? Do we follow no entry signs? DO we keep to our lane while driving? Do we have patience during traffic jam or take pride in going right – left – using wring side and push own vehicle ahead of all thinking others waiting are fool and then blocking the traffic coming from the other end? My impression is that traffic signals are mainly for vehicles and not for pedestrians. At certain junctions in Pune I was lost in finding out when should I cross the road as pedestrian? The controlling was all for vehicles. Also many a time in Pune you will see though the signal indicates red light which means STOP the drives see that from other side there is no vehicle coming then they straight away jump the red light – the mentality here is “why unnecessarily wait for red light when there is no traffic at all? We do not follow lane discipline. We overrule no entry signs. In this way we pass on all the indiscipline to our next generation who is brought up with this kind of social culture.

 

In our culture pedestrians are like shudras and vehicle drivers are like from other casts – car owners like Brahmins, two three wheeler owners like Kshatrias and truck owners like vaishyas. Pedestrians have no value – they should respect and give priority to vehicles – that is the way it is here.  What is the case in Europe and other developed countries? There pedestrians are given preference. They have dedicated footpath to walk, dedicated zebra crossing to cross the road and if one is on zebra crossing even fast moving vehicles slow down and even almost stop until one crosses the road. What is situation here in our country?  Most of the cities do not have proper footpaths for walking safely; even if they are there they are encroached by vendors. In fact our mentality is to shop on with vendors on foot path because it is "convenient" and "cheap". We do not find any abnormal if vendors occupy footh paths for their business. Zebra crossing is supposed to be area where vehicles are supposed to stop when traffic light is red.  If somebody is crossing on zebra zone the vehicle driver instead of slowing down accelerates his vehicle to see that the pedestrian has to rush away either on this or that side of the road.

Do we have right attitude? No – if somebody is overtaking me - first thought that comes to mind is “how come can he do that? Let me speed up my car and take him over” The starts the race. If somebody is crossing the road and traffic light turns green for vehicle and you are in car – will you have patience to wait till that guy crosses or you will keep on honking indicating that pedestrian to get away fast? If somebody overtakes you then how will you behave? Will you keep cool or by hook or crook taking wring side you will start the race and overtake him? How many of the drivers here make use of indicators? How many put right/left turning indicator light on at last moment just before turn? How many simply forget to put off the turning indicator light even after taking that respective turn? How many transport vehicles have tail light on especially at night? If heavy vehicle breaks down at night and is parked on the road how many drives put fluroscent indicators or let some cleaner wait there? They simply put branches of trees or stones to indicate that their broke down vehicle is parked there. Accidents have occured by cars ramming into such vehicles parked along side of the road without proper indicators. AT least they can put their indicator lights on. 

What about mentality? Mentality comes from upbringing. When you are driving bicycle then here you have not to obey traffic rules, you can bypass signals, you can go into no entry zone, and you can overtake and go from wrong side. This is because bicycle is vehicle which doesn’t not need more space, no license and will not cause major damage if something goes wrong. Normally person drives bicycle when he is in school. Now same person when he goes to college he gets scooter or motor bike from his parent and starts driving on the road; but he drives with mentality of driving a bicycle. He thinks that taking wrong side is normal; entering no entry zone is okay and same person when he takes car his mentality still remains same and that is what we see people driving cars haphazardly as if they are cycling and not driving.

How about systems? Yes systems are good. Systems are made by people for people and it is people who can make and break the system. If police catches you what will you do? Pay him bribe or ask for tax receipt? What if you hit somebody? Will you go to jail? What if you do not have valid driving license? What if you jump the red light? What if you do not have insurance or PUC paper? Do lose your driving license if you jump red light thrice or you exceed speed limit or you are caught driving with alcohol influence? There is no fear of law. There is always a way out – enough loopholes are there to escape and so come casual approach which is reflected in traffic here. Besides traffic discipline – how many vehicles have PUC done? Is PUC that is done authentic or manipulated?  How many old vehicles are on the road? How many are on LPG/ How many on CNG? How many of them use kerosene as fuel by mixing it with Petrol? What is control for diesel pollution? Implementation of laws, rules, regulations and resolutions is very slow. It takes time. Sometimes this is drawback of democratic system that we have.




What is procedure to get driving license? Sometimes you do not have to even go for test drive. Agent gets you driving license at home.  Imagine the person taking his bike or car on the road without attending the test at RTO. When the network of agent will get diminished? Why first of all such agent network is needed? Why the system can be more transparent in this regards?  What about qualification for driver? Is there any refresher test taken during license renewal? In this country for becoming politician who drives the nation or state there is no qualification required then just imagine what qualification will you need to become driver? The minimum highlight that should be given to new learner must be about safety, traffic discipline, safety of pedestrians, and safety of passengers in car and maintenance of vehicle that he is driving or he is going to drive.  Especially heavy vehicles like trucks and trailers must be maintained well to avoid break failure etc. The tendency is to get more business, earn more money and to ignore insurance, maintenance. In holiday seasons I have seen tourist drivers driving cars/ tracks without rest and ultimately risking their own and others lives. In such cases the tour operator must take care to give enough rest to the driver and driver must realize need of rest for his own safety. We do not have good infrastructure, we do not have good footpaths-in Pune now some cycle tracks are built – but it has become a big joke.  In Holland I have seen speical cycle tracks and special footpaths. If you are walking on cycle track and cyclist hits you then it is your fault. The cycle tracks there are continuous with dedicated traffic lights and zebra crossing for cycles. Safety of cyclist and pedestrians is most important and is ensured there. Just have a look at cycle tracks in Pune – concept is good but implementation is poor. On that track you will find scooters, motor bike and rikshaw driving, you will see motor bikes parked, even sometimes rikshaw parked. Moreover the tracks are not continuous. There is no safety for cyclist here. Cyclist will be taken for a ride. I remember reporter of PUNE MIRROR making an attempt to move through Pune on a bike and finally he was taken for a ride by the other vehicles to such a extent that he almost brushed death twice and finally gave up his task of biking in Pune. The report was published in PUNE MIRROR with photographs. Here also people mentality plays role. The cycle tracks must be used only for cycles. People must ask corporation to make these tracks continuous and safe so that children and people can go to school work on bicycles which will make life in the city bit comfortable.

But who has to do this change. Of course mentality is other should start first and I will follow later. Let us start by changing with our own attitude first. This change is going to be taking lot of time but at least our next generation – let them learn these discipline, traffic sense and let them follow in years to come. I look forward to traffic here like what I saw in Europe. It is possible. Let us make combined efforts – through social networking, awareness, self-discipline. We do not want tragic accidents to take place. We do not want victims of accidents.  We want everybody to safe.